कै. यशवंतराव चव्हाण कृषी पुरस्कार मारुती पाटील यांना प्रदान .
उंडाळे - प्रतिनिधी.
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्याचा गौरव करण्यासाठी सातारा जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने कृषी दिनी उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार वितरित करण्यात आला.
नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच आधुनिक तंत्रज्ञान वापरून उच्च उत्पादन घेणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यामध्ये साळशिरंबे गावचे सुपुत्र मा. मारुती पाटील यांनाही कै. यशवंतराव चव्हाण फलोत्पादन शेती पुरस्कार प्रदान करण्यात आला.शेतीमध्ये नवनवीन तंत्राचा अवलंब करून जास्तीत जास्त उत्पादकता कशी वाढवता येईल व किफायतशीर शेतीकडे यांचा कल राहिलेला आहे.


Post a Comment
0 Comments